यावल दि.७
घटनेचे शिल्पकार तथा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला साकळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे “शासनाच्या आदेशाची वाट पाहीली की.? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाकडे दुर्लक्ष केले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार घटनेचे शिल्पकार महान समाजपुर्नघटक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासारखा राष्ट्रीय महत्त्वाचा दिन असताना साकळी ग्रामपंचायतीने कोणताही कार्यक्रम घेतला नाही,मानवंदना,श्रद्धांजली यापैकी काहीही कार्यक्रम आयोजित न केल्याचा खळबळजनक संताप जनक प्रकार समोर आला आहे.
ग्रामस्थ,नागरिक,विचारवंत,बौद्ध उपासक यांनी या प्रकाराविरोधात नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर सर्रास टीकेची झोड उठविवली आहे.“आदेशाची वाट पाहणारी ग्रामपंचायत संवेदनशीलतेचा अभाव की अनास्था ?” स्थानिक नागरिकांचा प्रश्न —
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवसासाठीही शासनाच्या आदेशाची वाट पाहावी लागते का?
हातात सत्तेची शिकस्त आणि मनात संवेदनशून्यता अशी साकळी ग्रामपंचायत आहे का.? गावातील
विविध संस्था,सामाजिक संघटना, युवकांनी आपापल्या पातळीवर महापरिनिर्वाण दिन साजरा केला.मात्र ग्रामपंचायत तर्फे अधिकृत कार्यक्रम न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर “दुर्लक्षपणाचा”, “असंवेदनशीलता” आणि निष्क्रियतेचा आरोप ग्रामस्थांकडून लावला जात आहे.
लोकांचे सरळ शब्दांत मत:
“आंबेडकरी विचारांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.” “साकळी ग्रामपंचायत जागी होणार कधी?” “फक्त शासन आदेशाची वाट पाहून कर्तव्य झुगारून चालणार नाही.” समाजाच्या भावनांचा अनादर,
साकळी ग्रा.पं.विरोधात ग्रामस्थांनी कारवाईची,
चौकशीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा